बाल सहाय्य संरक्षण केंद्र (जापू)

About Us


कलम ३१ बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ प्रमाणे निराधार / विनापालक आढळणाऱ्या मुले व मुलींना संरक्षणात घेऊन त्यांना बालगृह डोंगरी किंवा मानखुर्द, मुंबई येथे पोहोचते करण्यात येते. निराधार/विनापालक बालकांना बाल कल्याण समिती, डोंगरी व मानखुर्द, मुंबई यांचे आदेशान्वये त्यांचे राहते गावी / नजीकचे बालगृह येथे परत पाठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते

हि शाखा बाल कामगार ( प्रतिबंध आणि विनियमन ) अधिनियम १९८६, कलम ३, १४ आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५, कलम ७५, ७९ अंतर्गत बाल कामगाराची सुटका करणे. याशिवाय, मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधक अधिनियम १९५९, कलम ५, ९, ११ आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५, कलम ७, ६ अंतर्गत बाळ भिकाऱ्यांची सुटका करते.

बाल कल्याण समिती, मुंबई शहर व उपनगरे यांच्या आदेशाने कलम ९५ बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ प्रमाणे अल्पवयीन मुले व मुलींना महाराष्ट्रातील त्यांचे जिल्ह्यात किंवा भारतातील त्यांचे राज्यातील बाल कल्याण तसेच बालगृह यांचे संरक्षणात देण्याचे कामकाज जापू (संरक्षण) शाखेद्वारे करण्यात येते.